संत सावता माळी महाराज यांची संपूर्ण माहिती

संत सावता माळी महाराज यांची संपूर्ण माहिती

 

कुटुंब

सावता माळी हे एक मराठी संतकवी होते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्या मध्ये अरण हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा होते, ते पंढरीचे वारकरी होते त्यांना दोन मुले होती पुरसोबा आणि डोंगरोबा पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत, पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.

सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे.

संत सावता माळी यांच्या बद्दल संत नामदेव म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।

जन्म

संत सावतामाळी हे पंढरपूर जवळील अरणभेंडी या गावचे रहिवासी असून त्यांच्या वडिलांचे नाव परसूबा आणि आईचे नाव नांगीताबाई होते. त्यांच्या जीवनाविषयी माहिती सांगायचे झाले, तर ते अरणभेंडी गावातील रूपमाळी भानवसे यांची मुलगी जनाईशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन अपत्ये होती. मुलगा विठ्ठल व कन्या नागाबाई ते गृहस्थाश्रमी असूनही विरक्त वृत्तीचे होते. ते पंढरपूरचे विठ्ठल यांचे अभंगाद्वारे व भक्ती द्वारे महिमा गायत असत. त्यांचा वारकरी संप्रदायातील संत जनार्दनमध्येही मोठा लौकिक होता. विठ्ठल भक्तीने भरलेल्या त्यांच्या अभंग रचनांनी काव्यामध्ये भक्तिभावानेचा मळा ते फुलवीत असतात. त्यांचे अभंग काही प्रमाणात उपलब्ध आहे.

जीवन

‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता.

‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.

ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते. परंतु या दिनांकाविषयी भेद् आहेत असे कळते. कालनिर्णय दिनदर्शिकेत सावता माळी यांची पुण्यतिथी २५ जुलै अशी दर्शवली आहे.

सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वारसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती.पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.

व्यवसाय

आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी संत सावता हे आपल्या शेतात दिवसभर कष्ट करीत असत. तसेच त्याचबरोबर ते ईश्वरभक्ती सुद्धा करत असत आणि ईश्वरभक्तीचा हा अधिकार सर्वांना आहे.
“न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची”

असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला होता. काशीबा गुरव नावाचे व्यक्ती त्यांचे अभंग लिहून ठेवत असत आपल्या मळ्यातील भाजीपाल्यामध्ये ही त्यांना विठ्ठलाचे रूप दिसते.

आमची माळीयाची जात | शेत लावू बागाईत |
कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी ||
लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ||

या अभंगांमध्ये संत सावतामाळी म्हणतात की, आमची जात माळी आहे आणि आम्ही आमच्या शेतामध्ये कांदा, मुळा, भाजी, लसूण कोथिंबीर आणि मिरची अशी बागायत शेतीमध्ये पीक घेत असतो आणि त्या मध्येच आम्हाला देव दिसतो. देवाला पाहण्यासाठी मंदिरांमध्ये जाण्याची गरज नाही, आपल्या कामांमध्ये देव असतो हेही त्यांना सांगायचं आहे. अध्यात्म भक्ती आणि आत्मबोध आणि लोकसंग्रह कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्म चरणातील अंधश्रद्धा कर्मठपणा दांभिकता यावर त्यांनी कोणाचीच ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले अंतर शुद्धी तत्त्वचिंतन सदाचार निर्भयता नीतिमत्ता संशोधन इत्यादी गुणांनी त्यांनी ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग्य तीर्थव्रत, कौशल्य या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन करणे किंवा नामस्मरण करणे यातच देव प्रसन्न होतो असे त्यांचे मत होते.

संत सावता माळी यांच्या विषयी एक आख्यायिका आहे की, संत सावतामाळी हे आपल्या शेतामध्ये खुरप्याने शेतातील काम करत होते. एकदा संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि पांडुरंग असे तिघे कूर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते. वाटेत सावतामाळी यांचे गाव अरणभेंडी लागली. तेव्हा पांडुरंगाने तुम्ही येथे थांबा, मी स्वतः भेटून येतो असे सांगितले. पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली, तो धावत धावत सावता माळ्याकडे गेला आणि म्हणाला माझ्या मागे दोन चोर लागले आहेत. मला कुठेतरी लपवून ठेव.

संत सावता यांनी बाल रुपी पांडुरंगाला खुरप्याने आपली छाती फाडून हृदयामध्ये लपून ठेवले आणि वरून उपकरणे किंवा कांबळे बांधले. ज्ञानेश्‍वर आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले आणि पांडुरंगाला शोधत सावता माळ्याच्या मळ्यापर्यंत आले. त्यांनी पांडुरंग कुठे आहे याची चौकशी केली. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते. त्यांना सावत्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे. हे समजले आणि मग सावता माळी यांना बरोबर घेऊनच हे तिघेही कुर्मदासला भेटायला गेले. या कथेत एक असा अंतरंगात भाग आहे की सावता माळी यांनी आपले पोट चिरुन आत पांडुरंगाला ठेवले.

ही कथा सत्य सत्याच्या कसोटीवर तपासून पाहणे शक्‍य नसले, तरी पोट चिरुन आत पांडुरंगाला ठेवण्याइतपत ताकदची काही गरज आहे असे वाटत नाही. संत सावता माळी आणि पांडुरंग यांचे अगदी जवळचे संबंध होते. एवढे जाणता आले तरी पुष्कळ आहे. संत सावतामाळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचे रूप पाहत असत. त्यांच्या सासरवाडीचे लोक एकदा त्यांच्याकडे आले. सावतामाळी भजनात रंगून गेले होते. त्यांनी सासरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही. पत्नी संतापली त्यावेळी त्यांनी आपल्या पतीला जो उपदेश केला तो असा की,

प्रपंच असुनी परमार्थ साधावा | वाचे आठवावा पांडुरंग |
उंच नीच काही न पाहे सर्वथा | पुराणीच्या कथा पुराणीच ||
घटका आणि परत साधी उतावीळ | वाउगा तो काळ जाऊ नेदी ||
सावता म्हणे कांती जपे नामावळी | हृदय कमळी पांडुरंग ||

आपल्या कामातच देव पाहणारे काम हाच देव परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसह हे अधिकार वाणीने परमार्थाचा उपदेश करणारे, सावतामाळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळ्याची मनोभावे जपणूक करीत होते.

लोकप्रिय अभंग

‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’

‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’

’’लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’

अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती

‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.

‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।

हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो.
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’

समाधी

त्यांच्या अभंगात त्यांनी म्हटले आहे. सावता म्हणे ऐसा मार्ग धरा |
जेणे मुक्तीद्वार ओळंगती ||

संत सावता माळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. त्यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्ती प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून विचारले त्यांचे 37 अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 दिनांक 12 जुलै 1295 यांनी आपला देह ठेवला. पंढरपूर जवळील अरण येथे संत श्रेष्ठ सावता महाराज यांची समाधी आहे.

आषाढ वद्य चतुर्दशी हा संत सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो. सावता महाराज आपले शेत सोडून कधी पंढरपूरला आले नव्हते असे मानले जाते. पांडुरंगच त्यांना भेटण्यासाठी अरण येथे गेले. आजही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही. आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे जाते. सावता महाराज समाधी मंदिर यांच्या शेताजवळ असून मंदीराजवळ विहीर आहे.

श्रोत :- marathischool, wikipedia

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहिती