श्री संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती

श्री संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती

संत एकनाथ महाराज

जीवन

सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (जन्म : पैठण, इ.स. १५३३; – इ.स. १५९९) हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यl दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.

नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.

ज्ञानेश्वर|संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.

’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य (एकनाथ षष्ठी हा) दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

संत एकनाथ जन्म: १५३३, पालनपोषण भानुदास महाराज (आजोबा)
आई/वडील: रुख्मिणी/सुर्यनारायण
कार्यकाळ: १५३३ ते १५९९
संप्रदाय: वारकरी
गुरु: जनार्दन स्वामी
समाधी/निर्वाण: इ. स. १५९९, फाल्गुन व ६, कृष्णकमल तीर्थात जाऊन आत्मा ब्रम्हांडात विलीन

जन्म व बालपण

त्यांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते.

वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा.

जन्म आणि कुटुंब

संत एकनाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात  1533 साली पैठण  येथे झाला. एकनाथ यांचे पंजोबा श्री भानुदास (1448-1513) होते, पंढरपूर येथील विठ्ठल पंथातील प्रमुख व्यक्ती होते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे सूर्यनारायण होते.

बालपणीच आई-वडील वारल्यामुळे एकनाथ पोरके झाले. आजोबांच्या छत्रछायेत ते लहानाचे मोठे झाले. आजोबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्माची व हरिकीर्तनाची आवड होती. गिरिजाबाई नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला. गिरिजाबाई अतिशय गृहकुशल होत्या.

एकनाथांना गोदा व गंगा नावाच्या दोन मुली आणि हरिपंडित नावाचा एक मुलगा होता. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची कुशलतेने सांगड घातली.

कार्य व लेखन

  • एकनाथी भागवत: भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका
  • चतु:श्लोकी भागवत
  • एकनाथी अभंग गाथा
  • संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ – एकूण २५ अभंग
  • हस्तमालक टीका
  • शुकाष्टक टीका
  • स्वात्मबोध
  • चिरंजीवपद
  • आनंदलहरी
  • अनुभवानंद
  • मुद्राविलास
  • लघुगीता
  • समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना.
  • ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.
  • रुक्मिणीस्वयंवर
  • भावार्थ रामायण (४० हजार ओव्या)हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)
  • संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधिस्थळाचा शोध

एकनाथांचे सामाजिक कार्य

सारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. संत एकनाथांनी आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचे जीर्णोद्धार केले. ज्ञानदेवांनी सुरू केलेले भागवत संप्रदायाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे चालू केले. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.त्यांच्या साहित्यातून त्यांनी रंजन व प्रबोधन केले.

आपले भाग्य आहे की एकनाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली. त्यांच्या भार्थ रामायणावरून आपण इस्लामिक राजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राची दुर्दैवी स्थिती पाहिली पाहिजे; त्यावेळी लोकांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पडझड होते. धार्मिक मंडळेही ढोंगीपणाच्या अभूतपूर्व पातळीवर खालावली होती.

संत एकनाथ महाराजांनी या अनिश्चित मार्गाने धर्माच्या मूर्ती तयार केल्या. त्यांच्यातील काहींनी एकनाथ महाराजांकडून धडे घेतले आणि स्वत: ला सुधारण्याचे काम केले आणि खरोखरच समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. एकनाथ महाराजांनी समाजाला हे सिद्ध केले की ‘भक्ती’ च्या माध्यमाने एखादा नियमित गृहस्थ तसेच आध्यात्मिक विकास होऊ शकतो.

एकनाथ महाराजांच्या जीवनाने लोकांना दाखवून दिले की ऐहिक साधने ही आध्यात्मिक साधनेदेखील असू शकतात. त्यांनी लोकांच्या आकांक्षा वाढवल्या आणि त्यांच्यात भागवत धर्म आणि मजबूत पात्र निर्माण करण्यासाठी अभिमान बाळगला. तथापि हे दुर्दैव आहे की एकनाथ महाराजांच्या कल्पना आणि शिकवण योग्यरित्या लोकांच्या अंतःकरणाने आणि मनामध्ये ओतता येण्यापूर्वीच, परदेशीयांनी केलेल्या हल्ल्यांनी लोकांचे प्रयत्न वळवले आणि त्यांचे प्रयत्न संक्षिप्त झाले.

एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली. यामध्ये वासुदेवा म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तींनी घरोघरी भेट दिली होती. लोकांच्या घरासमोर उभे राहून त्यांनी भजन संमेलनातून धार्मिक संदेश दिला.

आचारांची शुद्धता राखून त्यांनी कर्मठते विरूद्ध बंड केले. प्रेमळपणा, सौजन्य व शांती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. ते भूतदया मानत असत. त्या काळी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड दूर करण्यासाठी सोप्या भाषेत भारुडं, गौळणी लिहून उपदेश लोकांच्या मनावर बिंबवला.

त्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले अन्याय, अत्याचार या विषयी ‘रोडगा’ या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली आहे. स्रीला नकाराचे स्वातंत्र्यच नव्हते. लहान वयातच घरातील मंडळी तिचे लग्न लावून देत असत. फक्त संसार करायचा यापलीकडे तिने विचारच करायचा नाही असा तो काळ होता. त्या काळातील स्त्रियांना जणू या भारुडाने बोलकं केले…

|| फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी, शिवाया दोराच नाहीं, मला दादला नको गं बाई ।।

अशा प्रकारे तिच्या मूक भावनेतून तिच्या विचारांना व्यक्त करण्याचे काम संत एकनाथांनी केले. महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्त्रियांची प्रातिनिधिकस्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्त्रियांचे दुःख शब्दांत मांडले.

एकनाथ हे महाराष्ट्रातील अस्पृश्यतेच्या सुरुवातीच्या सुधारकांपैकी एक होते, ते मध्ययुगाच्या उत्तरार्धात कार्यरत होते. ज्या काळात ब्राह्मणांनी अस्पृश्य लोकांची सावली आणि आवाज टाळला, त्यांनी अस्पृश्यांकडे जाहीरपणे शिष्टाचार दाखवला आणि वारंवार त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

एकदा त्यांनी तापलेल्या उष्णतेपासून वाचवून महार मुलाचा जीव वाचविला, तो मुलगा गोदावरीच्या गरम वाळूमध्ये भटकत होता. एकनाथ एका मागासलेल्याच्या अंगाला हात लावल्याने गावातल्या ब्राह्मणांना राग आला. त्यांची विटंबना करण्याच्या हेतूने, त्याने त्यांच्या अमानुषतेचे अमानुषपणा पाहण्याची आशा बाळगून, त्याच अशुद्धता धुण्यासाठी त्याच नदीत स्नान केले.

त्यांच्या कविता प्रत्येक वाचकांना दयाळूपणे आणि माणुसकीने, एका भावाने, बहिणीप्रमाणे, वागण्याचे आवाहन त्यांच्या वाचकांना करतात. या आवाहनात पक्षी, प्राणी आणि वनस्पती देखील समाविष्ट आहेत. त्याच्या सर्वात आवडत्या कवितांपैकी एक म्हणते, की तुम्हाला भेटणारा प्रत्येक आत्मा तुमचा देव आहे.

एकनाथांच्या शिकवणीचा सारांश “विचार, उच्छर आणि आचार” म्हणजेच विचार, बोलण्यात आणि क्रियेमध्ये शुद्धता असू शकतो. जेव्हा त्याची कार्ये, वचने आणि उपदेश यामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली जेव्हा त्यांना त्या सर्वांची सर्वात जास्त गरज होती.

परंपरा

एकनाथांची गुरुपरंपरा :

नारायण (विष्णू)
ब्रह्मदेव
अत्री ऋषी
दत्तात्रेय
जनार्दनस्वामी
एकनाथ
एकनाथांची शिष्यपरंपरा : संत एकनाथ महाराजांच्या शिष्य शाखा महाराष्ट्र आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्यापैकी काही , श्री नारायणगड (बीड), श्री भगवानगड(नगर), श्रीनाथपीठ (अंजनगावसुर्जी), श्री अमृतनाथस्वामी मठ (आळंदी), श्री तुकाविप्र महाराज (पंढरपूर,अंजनवती),श्रीकृष्णदयार्णव महाराज (भारतातील सर्व मठ), श्री गोपालनाथमहाराज

एकनाथांची वंशपरंपरा : संत एकनाथांच्या वंशजांची अनेक घरे पैठण आणि बाहेरही आहेत. उपलब्ध माहितीनुसार नाथांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी त्यांची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची धुरा नेटाने चालविली. कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांनी त्या त्या काळी छाप पाडल्याचे अनेक कागदपत्राद्वारे लक्षात येते. त्यांच्यातील पहिले रामचंद्र (भानुदासबाबा) यांचा उल्लेख ग. ह. खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ गुरूंपैकी एक असा केलेला आहे. छय्याबुवा म्हणून चौथ्या पाचव्या पिढीत एक सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या संबंधी अनेक कथा सांगितल्या जातात. सहाव्या सातव्या पिढीतील काशिनाथबुवा व रामचंद्रबाबा (२रे) यांचा मोठा प्रभाव भोसले,पेशवे, शिंदे, होळकर,निंबाळकर,गायकवाड, धार देवास आदींवर असल्याचे दिसते. काशिनाथ बुवा यांचा उल्लेख गायक म्हणून येतो तर रामचंद्रबाबा (२रे) यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक म्हणून येतो. सद्यपरिस्थितीत योगिराज महाराज गोसावी ( योगिराज पैठणकर ) यांचे नाव नाथांचे १४ वे वंशज म्हणून संप्रदायात अग्रक्रमाने घेतले जाते.

नाथांचा भक्तांना उपदेश

नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला तो असा की, अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरीनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होय. नाथांची शिकवण होती सर्व धर्म, पंथ, जाती-उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानवजातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममाण झाले होते.

एक प्रसंग असा घडला, रणरणत्या उन्हात एका हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळ्ल्याने थयथय नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचा आचार होता.

नाथांनाच स्वप्नात दृष्टांत झाला होता की, आळंदी येथील समाधिस्थ ज्ञानदेवांच्या गळ्याभोवती अजानवृक्षाच्या मुळ्यांचा विळखा पडला होता. नाथांनी प्रत्यक्षात तेथे जाऊन त्या मूळ्या कापून ज्ञानदेवांचा गळा मोकळा केला होता. त्यांनीच ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुध्द प्रत तयार केली होती. नाथांच्या घरचा श्रीखंडया म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच (भगवान कृष्णाचाच) अवतार होता. नाथांच्या हातून ग्रंथनिर्मिती व्हावी म्हणूनच हा जणू त्यांच्या सेवेत आला होता.

श्रीमद्भागवतातील भक्तिप्रधान अशा अकराव्या स्कंधावर त्यांनी प्राकृत भाषेत एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला आहे. ह्या त्यांच्या ग्रंथास जनमानसात खूपच कीर्ती लाभली. नाथांनी काशी, रामेश्वरादी तीर्थयात्रा केल्या होत्या. रामेश्वरक्षेत्री त्यांनी तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजल्याची कथा सर्वश्रृत आहे. त्यासंबंधात ते म्हणाले होते, “सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी परमेश्वर भरला आहे. तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजणे हेही धर्मपालनच आहे.”

पैठण या तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे. पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती.

नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखणीही ओघवती होती. कृष्णभक्ती आणि आत्मबोधाचे वर्णन असलेला ‘रूक्मिणी स्वयंवर’ हा ग्रंथही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो. त्याच बरोबर ते बहुजन समाजात वावरत होते. त्यामुळेच वासुदेव, वाघ्या, मुरळी, कोल्हाटीण, विंचू, सर्प, दळण, कांडण, जोगवा, गोंधळ, कापडी, पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारूड रूपात केलेले कवित्व खूप काही अध्यात्म सांगून जाते. भारूडांप्रमाणेच नाथांच्या अभंगातून तत्कालीन समाजाचे चित्रण उभे राहते. त्यांच्या आरत्या तर घरोघरी पोचल्या आहेत. ते अभंग अगर आरतीच्या शेवटी लिहीत, ‘एका जनार्दनी’ म्हणजेच आपल्याबरोबर ते आपल्या गुरूंचेही नाव जोडीत.

नाथ त्यांच्या घरी राहणाऱ्या श्रीखंडयाला म्हणाले होते “फाल्गुन वद्य षष्ठी हा माझ्या गुरूजींचा जन्मदिवस आणि निर्वाणदिवस आहे. तेव्हा आमचेही निर्वाण याचदिवशी होणार आहे कारण माझे कार्य आता संपलेले आहे” आणि खरोखरच इ.स.१५९९ मध्ये नाथांनी गोदावरी नदीत आत्मसमर्पण केले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ सहासष्ठ वर्षे जगले.

नाथांनी बहुजन समाजाला अध्यात्माचे ज्ञान व्हावे म्हणून प्राकृत भाषेत विपुल लिखाण केले. सर्वांभूती समभाव दाखविला मानवनिर्मित कृत्रिम भेदांना त्यांनी छेद दिला आणि मुख्य म्हणजे संसारात राहूनही परमार्थ साधता येतो हे स्वानुभवाने दाखवून दिले. अशा या थोर संताला आदरांजली वाहण्यासाठी आजही हजारो लोक फाल्गुन वद्यषष्ठीला पैठण मुक्कामी जातात आणि दर्शन, भजन-पूजन-प्रवचन व कीर्तन करून नाथांच्या नावाचा गजर करतात.

संत एकनाथांचे निधन

संत एकनाथांनी 25 फेब्रुवारी 1599 फाल्गुन वद्य षष्ठी, शके 1521 या दिवशी देह सोडला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. आजही हजारो भाविक षष्ठीला संत एकनाथांच्या दर्शनास पैठणला दरवर्षी जातात. अशा या थोर संताला माझे कोटी कोटी प्रणाम !

श्रोत : wikipedia, marathischool

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहिती